मल्हारयोद्धा हजारे, गोयकर यांची जातपडताळणी कार्यालयाकडे आगेकूच!
खिल्लारे कुटुंबियांचे बोगस प्रमाणपत्र रद्दची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नसल्याचा निर्धार
लातूर/प्रतिनिधी : धनगर समाजाला मागील जवळपास 70 वर्षात सर्वच पक्षाच्या राज्यसरकारने वेळकाढूपणा केला असून धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच नाही. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला फक्त एका कुटुंबाच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा तुघलकी कारभार सरकारच्या वतीने केला जात आहे.
मागील २० दिवस लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषण केले आता आमरण उपोषण थांबवून खिल्लारे कुटुंबियांचे बोगस जातप्रमाणपत्र रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय उपोषणस्थळी शनिवार (दि.२८) रोजी धनगर समाजाच्या बैठकीत झाला. उपोषणकर्त्यांना समाजबांधवांनी लातूर येथील उपोषण स्थगित केले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयासमोर आंदोलन असल्याचे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी जाहीर केले.
एसटी आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि आम्ही ते मिळवणारच, असा निर्धार मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी निर्धार व्यक्त केला. राज्य सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी बाबत तात्काळ निर्णय घेऊन न्याय दिला नाहीतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सरकारला चुकवावी लागेल. या आक्रमक पावित्र्यात धनगर समाज असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.